हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आजपासून म्हणजेच १४ सप्टेंबरपासून पुढील आठवड्यापर्यंत, १८ सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विशेषतः रविवार आणि सोमवार, १४ व १५ सप्टेंबर रोजी राज्याच्या अनेक भागांत अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
- पुणे व सातारा जिल्ह्यांचे घाटमाथे: मावळ, मुळशी, ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, वेल्हे, तसेच महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि परिसरात या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे.
- मुंबई, कोकण आणि विदर्भ: या सर्व भागांमध्ये आजपासून पुढील १० दिवसांपर्यंत, म्हणजेच २२ सप्टेंबरपर्यंत, पावसाचे सातत्य कायम राहील.
पावसाचा जोर कोणत्या भागात वाढणार?
१६ सप्टेंबरपासून मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे
परतीच्या मान्सूनची स्थिती
सध्याच्या वातावरणीय स्थितीनुसार, परतीचा मान्सून १५ सप्टेंबरच्या आसपास किंवा त्यानंतर महाराष्ट्रातून परत फिरण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा वातावरणातील बदलांचे निरीक्षण केल्यानंतरच केली जाईल.
शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.